Categories

Most Viewed

06 सप्टेंबर दिनविशेष

1930 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राव बहादुर आर श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेत हजर राहण्याचे आमंत्रण गव्हर्नर जनरल यांनी दिले.

1943 : मजूरमंत्री विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय मजूर परिषदेचे दुसरे अधिवेशन संपन्न झाले. आपल्या भाषणात त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक साधने आणि आरोग्याची साधने याविषयी कामगारांच्या मागण्या मांडल्या.

1954 : ‘ वर्गीकृत जाती आणि अन्य वर्गीकृत जाती ‘ आयुक्त यांच्या प्रतिवृत्तावर भाषण करताना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या बाबतीतल्या सरकारी धोरणावर आणि हिंदूच्या वृत्तीवर खरमरीत टीका केली.

1954 : अस्पृश्यता विषयक गुन्हे या विधेयकावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेत म्हणाले की, “अस्पृश्य बाबत गुन्हा करणाऱ्यांना शासन केल्याविना अस्पृश्यतेचे निर्मूलन होणार नाही. सामाजिक बहिष्कार टाकणा-यांना शिक्षा दिली पाहिजे. कारण ते आपल्या सांपत्तिक स्थितीमुळे खेड्यातून अस्पृश्यांवर बहिष्कार टाकून त्यांना घटनेने दिलेले अधिकार उपभोगण्यास प्रतिबंध करू शकतात.”

2001 : महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये, डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, 17 वा खंड आयुष्यमान वसंत मून यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password